!! श्रीनाथ जागरण गोंधळ पार्टी !!
- गोंधळ हे अगदी पूर्वापार कुळधर्मानुसार चालत आलेले प्रतीकात्मक विधीनाट्य आहे.स्वर्गलोकापासून ते मनुष्यलोकांपर्यत विविध प्रकारे याचा इतिहास आहे.आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती मिळावी यासाठी हा विधीनाट्य केले जाते.
- लग्न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
- जोंधळ्याचा ताटाचे तिकाटणे, कवड्याची माळ या सगळ्या प्रतीकांना सृजनाचा अर्थ लावता येतो.
- नवरात्र, विवाहसोहळे, गृहप्रवेश आणि अन्य शुभकार्यांच्यावेळी गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
- आमच्याकडे कुळधर्म कुळाचारानुसार लग्नाचे गोंधळ, स्थापणूक, नाथांचे भराड, मुंजीचे गोंधळ, पांजीचे गोंधळ, त्रैवार्षिक गोंधळ, तसेच विविध देवदेवतांच्या जागरण आणि गोंधळ विधीसाठी गोंधळी मिळतील.
- जागरण,शिवव्याख्यान, पोवाडा, भारुड, तसेच विविध लोकसंगीताचे कार्यक्रम स्विकारले जातील.